पांचालवर आक्रमण आणि द्रुपद आगमन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पांचालवर आक्रमण आणि द्रुपद आगमन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी




 

पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी

कौरवांचे पांचालवर आक्रमण केल्यावर पांचालनरेश द्रुपदने प्रतिहल्ला करून कौरव कुमारांना बंदी बनवून टाकले. पण पाच पांडव काही केल्या सापडले नाही. द्रुपदने सर्व सैनिकांना आदेश दिला कंपिल्या नगर व त्याच्या आसपासच्या परिसरात जाऊन त्या पाच कुमारांना शोधून आणा म्हणून आदेश दिला. तेवढ्यात धनुष्यातून बाण सुटावा तसे पाचही वीर पांडव वेगाने पांचाल सेनेकडे येत होते. सर्वात पुढे गदा धारण करून भीमसेन त्याच्या पाठीमागे रथात धनुर्धारी अर्जुन. अर्जुनाच्या रथाच्या पाठीमागे धर्मराज युधिष्ठीर याचा रथ आणि त्याच्या रथाचे रक्षण करणारे खड्गधारी नकुल आणि सहदेव. हा पांडवांचा येणार बाण थेट पांचालच्या सेनेत घुसला.




भीमसेन आपल्या भल्या मोठ्या पोलादी गदेने एखादा मदमस्त पिसाळलेला हत्ती वनांमध्ये घुसून वनांचे जसे नुकसान करतो आणि त्याला आवरणे अशक्य होतं त्याप्रमाणे पांचालचे सैन्य हवेत उडू लागले. आणि त्यातील कोणी जरी वाचले तर त्यांना अर्जुन आपल्या तीक्ष्ण बाणाने वेधून काढी. नकुल, सहदेव आपल्या जेष्ठ बंधू युधिष्ठीर सहित पांचाल सेना कापत कापत थेट द्रुपदच्या रथाला भिडले.

द्रुपद - अर्जुन युध्द

द्रुपद आपल्या चालत्या रथावरून आपल्या धनुष्या द्वारे वर्षा करावी त्या प्रमाणे बाणांची वर्षा करू लागले. पण अर्जुनाने त्याचे उत्तर आपल्या वायू अस्त्राने दिले ते सर्वच्या सर्व बाण हवेतल्या हवेतच भिरकावुन लावले. त्या नंतर अर्जुनाने द्रुपदचा सारथी मारून रथ एका जागेवर स्थिर केला. द्रुपदाने आपल्या भात्यातील एक बाण काढून तो बाण अग्नी अस्त्राने अभिमंत्रित केला, तो बाण अर्जुनाच्या रथावर सोडला. अर्जुनाने हे जाणून धनुष्यावर वरुणअस्त्राचा मंत्र उच्चारला आणि रथाच्या दिशेने येणारा तो अग्नीबाण हवेतच थंड केला. अर्जुनाने चपळता दाखवत द्रुपदच्या हातातील धनुष्य भंग केला. दुसरा धनुष्य घ्यायच्या आत अर्जुनाने पाश अस्त्राने द्रुपदाला रथावरच बंदी केले. जाड अश्या दोरखंडाच्या साहाय्याने द्रुपद बंदी झाला. अर्जुनाने आपल्या कटीवरील खड्ग हातात घेवून रथातून उडी घेतली, आणि थेट चालत तो पांचाल नरेश द्रुपद यांच्या रथावर चढत द्रुपदाच्या गळ्याला हातातील खड्ग लावून सेनेला म्हणाला " थांबा ! पांचालराज द्रुपद बंदी झाले आहेत, सर्वांनी आपले शस्त्र खाली ठेवावे, नाही ठेवले तर आपल्या राजाचे मस्तक धडा वेगळे झालेच समजा."




द्रुपद बंदी

अर्जुनाच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी आपआपली शस्त्रे खाली ठेवली. पांडवांकडून आज पांचाल आज पराभूत झाले होते. युधिष्ठीराने तिथल्या पांचाल सैनिकांना आदेश दिला की " शंभर कौरव बंधूंना त्वरित मुक्त करावे," त्या आदेशाबरोबरच त्यांनी कौरवांना मुक्त केले. बंदी झालेल्या अवस्थेत अर्जुनाने द्रुपदला रथात घातले आणि स्वतःही रथात बसून हस्तिनापूर सीमेच्या दिशेने निघाला. त्या रथा मागे युधिष्ठीर, भीम, नकुल, सहदेव यांची रथ ही निघाले. चर्मण्वती नदी किनारी द्रोणाचार्य आपल्या शिबिरात बसले होते तेव्हा अचानक घोडे आणि रथाचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यांनी पहिले की धनुर्धर अर्जुनाच्या रथात पांचाल नरेश द्रुपद खाली मान घालून दोरखंडाने बंदी झालेला पाहून गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्याना दिलेल्या विद्येचे, शिक्षणाचे सार्थक झाल्याचे समाधान झाले. त्याचबरोबर अर्जुनाने धनुर्विद्येचा उपयोग करून पांचाल सारख्या बलाढय शत्रूचा सुध्दा पराभव केल्याचे पाहून त्यांची छाती गर्वाने भरून गेली.

द्रोणाचार्यांच्या मनात एक विचारांचे वादळ निर्माण झाले. पांचाल नरेश द्रुपदाने भरसभेत केलेला द्रोणाचार्य यांचा अपमान, विद्येचा केलेला उपहास, ते विसरले नाहीत, त्याचाच प्रतिशोध आज पूर्ण झाला. द्रुपदने आपले मस्तक झुकविलेले होते, दोरखंडात त्यांना जखडले होते, एकीकडे नकुल आणि दुसरीकडे सहदेव यांनी त्यांना दोरखंडाच्या साहाय्याने खेचत होते. पांडव द्रुपदाला घेऊन जवळ येताच, जेष्ठ पांडव युधिष्ठीर यांनी प्रणाम करून नम्रपणे म्हणाला " हे गुरुदेव आम्हांकडून आपण सांगितलेली गुरुदक्षिणा स्वीकार करावी." गुरु द्रोणाचार्य खुश होऊन म्हणाले " पांडवांनो तुमचे सदैव कल्याण होवो, यशस्वी भव: " त्यांनी द्रुपदाला दोरखंडातून मुक्त करण्याचा आदेश दिला. गुरु द्रोणाचार्य म्हणाले " हे पांडवांनो, आपली गुरुदक्षिणा मला मान्य आहे. माझ्या मित्राला आता मुक्त करा." द्रुपदने आश्चर्याने आपली मान वर केली त्यांना हे काय होतंय काहीच कळेना. नकुल - सहदेव यांनी पांचाल नरेश यांना दोरखंडाच्या बंधनातून मुक्त केले.




अपमानाचा वचपा 

द्रोणाचार्य उपहासाने द्रुपदाला म्हणाले " हे मित्र द्रुपद, पाहिलंस का ?, मी केवळ मैत्री मागितली होती, तू तर मैत्री सोडच उलट माझा अपमान केला होतास, आणि मला म्हणाला होतास की मैत्री फक्त बरोबरी असणाऱ्यातच होऊ शकते. बघ ! आज मी संपूर्ण पांचाल राज्य जिंकून राजा झालो आहे. पण तुझ्याकडे कुठे राज्य आहे. तू तर माझ्या बरोबर मैत्री करण्यास सुध्दा योग्य राहिला नाहीस, पण मला तुझी केवळ मैत्री हवी होती मित्र द्रुपदा !, तू माझा आणि माझ्या विद्येचा अपमान केला होतास तेव्हा मी शपथ घेतल्या प्रमाणे माझा शिष्यच तुझा पराभव करेल असे म्हणालो होतो ते वचन माझ्या शिष्यानी पूर्ण केले आहे, तू म्हणाला होतास ज्याला राज्य नाही तो राजाचा मित्र असू शकत नाही. म्हणून मी तुझे संपूर्ण पांचाल शिष्यांकरवी जिंकले आहे , या माझ्या पांचाल राज्याचे अर्धे राज्य म्हणजे गंगेच्या दक्षिणेकडील अर्धे पांचाल राज्य तुला देतो. आणि उत्तरेकडील अर्धे पांचाल राज्य मी स्वतःकडे ठेवतो. आता आपण दोघेही राजे झालो आहे. आता आपल्यात मैत्री असण्यात काहीही हरकत नाही."

द्रुपद खजील होऊन, खाली मन घालून चालत आपल्या कंपिल्या नगराकडे निघून गेला.




to be continued....

द्रोणाचार्यांची गुरुदक्षिणा

 

गुरु द्रोणाचार्यांनी रंगभूमी वरील शक्ती प्रदर्शन केल्यानंतर सर्वांच्या शक्ती, बुध्दी आणि बल, यांचा परिचय झाला होता त्यांनी असे ठरवले की मागील बारा वर्षांपासून कुरु कुमार आश्रमात राहून विद्या ग्रहण करून तयार झाले आहे. त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता वेळ आली होती ती गुरुदक्षिणेची.




द्रोणाचार्यांची गुरुदक्षिणा

गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्याना बोलवून सांगितले की " माझ्या प्रिय शिष्यांनो तुमच्या सर्वांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आता तो समय आला आहे, की शिष्यांनी गुरु इच्छित आपल्या आचार्यांना  गुरुदक्षिणा देण्याची." तेव्हा सर्व शिष्य म्हणाले " सांगा आचार्य, आपण सांगाल ती गुरु दक्षिणा आम्ही देऊ आपणास काय हवे आहे सुवर्ण, माणिक, मोती, गायी, भूमी, काय हवे आहे ते आम्ही आपल्याला दक्षिणा स्वरूपात देऊ." आचार्य द्रोण हसून म्हणाले " मला या पैकी काहीही नको आहे, मी जे मागणार आहे ते कोणी एक शिष्यच काय तर तुम्ही संपूर्ण शिष्य मिळून ती ईच्छा पूर्ण करेल की नाही ही शंका आहे मला, माझी एकाच ईच्छा आहे की, पांचाळ नरेश, द्रुपदला युध्दात बंदी करून माझ्या समोर उभे करावे हीच माझी सर्वोत्तम दक्षिणा असेल, कोण पूर्ण करेल माझी ही ईच्छा "

सर्व कुरु कुमार ही अजब गुरु दक्षिणा ऐकून आश्चर्य चकित झाले, कारण पांचाल नरेश द्रुपद काही साधा राजा नव्हता तर हस्तिनापूर सारखेच खूप जुने आणि महापराक्रमी योध्दे या राजघराण्यामध्ये जन्मले होते. हस्तिनापूर सारखेच विशाल आणि सुरक्षित असे राज्य आणि तेवढीच सुरक्षित त्यांची

पांचाल नरेश द्रुपद

त्या राज्याचा राजा महाराज द्रुपद हा महान ऋषी भारद्वाज आणि अग्निवेश यांच्या आश्रमात राहून द्रोणाचार्य सोबत विद्या ग्रहण केली होती. म्हणजेच द्रोणाचार्य यांच्या समान ते योध्दे होते. विविध अस्त्र आणि शस्त्र धारण करणारे द्रुपद यांना जिंकून बंदी करणे खुप अशक्यप्राय होते. गुरु द्रोणाचार्य यांच्या या आगळ्या वेगळ्या दक्षिणेला प्रथम कोणी होकार दिला नाही, पण लगेच अर्जुन आपल्या हातातील धनुष्य आकाशात उंचावून म्हणाला " आचार्य मी त्या पांचाळधिश द्रुपद यास बंदी करून आपल्या चरणांवर टाकेन." गुरु मनातुन आनंदी झाले. अर्जुनाने असे म्हटल्या बरोबर दुर्योधन, दुःशासन, इत्यादी अनेकांनी " मी त्यास बंदी करेन, मी त्यास बंदी करेन, असे मोठमोट्याने कोलाहल करू लागले.




द्रोणाचार्य म्हणाले " पांचाल नरेश द्रुपद बरोबर युध्द करून त्यास बंदी बनवणे एवढे सोप्पे नाहीये, हस्तिनापूर सारखेच ते एक समृध्द राज्य आहे. द्रुपद माझ्या सारखाच शूर, वीर, क्षत्रिय आहे विविध शस्त्र तो चालवू शकतो. धनुर्विद्येत माझ्या एवढीच त्यालाही अस्त्र ज्ञात आहेत. उत्तरेस हिमालयापासुन दक्षिणेस चर्मण्वती नदी पर्यंत, पूर्वेला कुरु, मत्स्य, शूरसेन हे राज्य आणि पश्चिमेला नैमिषारण्य अशा या विस्तृत भूमीवर पांचाल राज्य आहे. 'कंपिल्यनगर' ही पांचाल राज्याची राजधानी, द्रुपद याची सैन्य संख्या दोन अक्षौहिणी सेना आहे एक्केवीस हजार, आठशें सत्तर रथ, एक्केवीस हजार, आठशें सत्तर गज, आणि एक लाख, नऊ हजार, तीनशे पन्नास सैनिक, पासष्ठ हजार, सहाशे दहा अश्व, येवढे सैन्य म्हणजे एक अक्षौहिणी या सैन्याच्या दोन पट द्रुपदकडे सैन्यबळ आहेत. या बरोबरच त्याचा सेनापती शिखंडी हा सुध्दा अजेय आहे. सुमित्र, प्रियदर्शन, व्याघ्रदत्त, चित्रकेतू, शत्रूंजय इत्यादी अनेक द्रुपद पुत्रांच्या संरक्षणामध्ये पांचाल नरेश द्रुपद असणार या सर्वांचा पराभव करूनच द्रुपद पर्यंत तुम्ही पोहचु शकता."

विकर्ण म्हणाला " आचार्य आपण हे सांगुन आमचा आत्मविश्वास कमी करताय का ?" द्रोणाचार्य म्हणाले " नाही विकर्ण मी तुमचा आत्मविश्वास नाही कमी करत पण शत्रूचे बल मापन करून प्रहार करणे केव्हाही योग्य ठरेल. तर सर्व शिष्यानो उद्या सूर्योदयासमयीं युध्दासाठी शस्त्र - अस्त्र सहित आपण हस्तिनापूरच्या सीमेवर जाणार आहोत आणि जर कोणाला या भयंकर युध्दाचे भय वाटत असेल तर त्याला मी गुरुदक्षिणेच्या दायित्वातून आत्ताच मुक्त करतो. उद्या प्रातःकाळी आपण चर्मण्वती नदी किनारी आपले शिबीर असणार आहे तिथेच आपण भेटू या ." असे म्हणून द्रोणाचार्य निघून गेले. कौरव आणि पांडव हे रात्री उशिरा पर्यंत उद्याच्या युध्दात पांचाल नरेश द्रुपद यांच्या बरोबर कोण, कसे लढावे याचे नियोजन, युद्धनिती आखत करत होते.




युध्दाची तयारी 

दुसऱ्या दिवशी पहाटेच द्रोणाचार्यांचे सर्व शिष्य आपआपल्या शस्त्र - अस्त्रे धारण करून आपल्या विविध पताका आणि अश्वांनी युक्त रथांवर आरूढ होऊन सूर्योदयापूर्वीच चर्मण्वती नदी किनारीला असलेल्या शिबिरात पोहचले, सर्व शिष्य आपआपल्या रथातून उतरून शिबिरासमोर आले, त्या अगोदरच आचार्य द्रोण तिथे आलेले होते. त्यांनी त्या रथांमधून येणाऱ्या शिष्यामध्यें अंगराज कर्ण पण आलेला पाहून कपाळावर आठ्या निर्माण झाल्या, शिष्य जवळ येताच सर्वांनी आचार्यांना प्रणाम केला. द्रोणाचार्य म्हणाले " प्रिय शिष्यांनो, ही जी गुरुदक्षिणा मी मागत आहे ती माझ्या शिष्याकडे मागत आहे. जो माझा शिष्य नाही त्यांनी गुरुदक्षिणा देण्याचा प्रश्नच येत नाही, या सामर्थ्याच्या परीक्षेत भाग घेऊ नये. त्यांनी परत हस्तिनापुरी सन्मानाने जावे आणि मी दिलेल्या विद्येच्या, शिक्षणाच्या बळावर माझे शिष्य गुरुदक्षिणा देण्यास समर्थ आहेत, असें मला वाटते इतर कोणत्या राजाची मदत माझ्या शिष्यांनी घेऊ नये." तेव्हा सर्व जण विजय धनुष्य धारण केलेल्या अंगराज कर्ण यांच्याकडे पाहत होते. अपमान झालेला अंगराज कर्ण कोणाला काहीही न बोलता परत हस्तिनापुराकडे निघून जातो.

द्रोणाचार्य सर्वांना युध्दासाठीच्या सूचना देत होते, द्रोणाचार्य म्हणाले " ही समोर असलेली चर्मण्वती नदी ओलांडली की पांचालचे राज्य सुरु होते. मला फक्त जिवंत द्रुपद माझ्या समोर बंदी झालेला हवा आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या सामर्थ्याचे परिचय पांचालनरेशला देऊन त्याचा अहंकार नष्ट करा, यशस्वी व्हा, प्रस्थान करा."

to be continued....

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...