पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

द्रौपदी आणि धृष्टधुम्न जन्म

 


रामायणातील कथा

 

द्रोण शिष्यां कडून पराभव झाल्यामुळे द्रुपदाला फार दुःख झाले, झालेल्या पराभवाचा सूड घेल्याशिवाय मन स्थिर होत नव्हते. क्षत्रियतेज ब्राम्हतेजासमोर निस्तेज पडले, त्याच ब्राम्हतेजाचा नाश करण्यासाठी एक महान पुत्र असावा असेच पृषतपुत्र द्रुपदाला वाटू लागले. मनात आचार्य द्रोण यांना मारण्याचा विचार येत होता. पण द्रोणाचार्य ब्राम्हण असल्याने ब्रम्हहत्याचे पातक कोण घेणार याच विचाराने ते सदा व्याकुळ राहत होते. ही व्याकुळता पाहून पांचालच्या मंत्री पैकी कोणीतरी एकांनी त्यांना रामायणातील कथा सांगितली, अयोध्येतील चक्रवर्ती राजा दशरथाची, मंत्री म्हणाले " हे राजन !, पांचालधिपती फार पूर्वी त्रेतायुगामध्यें अयोध्या नामक राज्यांतील शूर राजा दशरथ हे पृथ्वीवरीलच नव्हे तर देवांनासुध्दा त्यांची मदत घ्यावी लागली येवढे महान राजा राज्य करत होते, पण मनात एक दुःख सतत सलत होते ते म्हणजे निपुत्र असल्याची, त्यांना महान पुत्राची अपेक्षा होती, त्यांनी ब्रम्हर्षी वशिष्ठ यांच्याकडून पुत्रकामेष्ठी यज्ञ करून घेतला तेव्हा त्यांना यज्ञातुन अग्नी प्रकट होऊन पायसचे दान दिले. दशरथानी ते पायस आपल्या तिन्ही पत्नीस म्हणजे कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी यांना समान रूपात दिले. तेव्हा त्याचे फलित म्हणून कौशल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण, आणि कैकयीला भरत आणि शत्रूग्न असे चार पुत्र उत्पन्न झाले. राजन ! त्याप्रमाणे आपणही एका सिद्ध ऋषी मुनी करवी पुत्रकामेष्टी यज्ञ करून द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त करून घ्यावा." हा विचार द्रुपदला मान्य झाला कारण त्यांना माहीत होते की समस्त पृथ्वीवरील कोणताच क्षत्रिय अस्त्रवेत्ता, ब्रम्हास्त्रधारी, भारद्वाज पुत्राला, द्रोणाचार्याला हरवू, मात देऊ शकत नाही. त्यासाठी दैवी गुण असलेला एक महान क्षत्रिय पुत्र, पुत्रकामेष्ठी यज्ञाद्वारे प्राप्त करून घ्यावा, जो द्रोण वध करू शकेल. पण अडचण ही होती की कोण हे यज्ञ करणार.?

 

याज आणि उपयाज ऋषी

 

द्रुपद राजाने आपल्या पांचाल राज्यात दवंडी पेटवली की, पुत्रकामेष्टी यज्ञ करेल अशा ऋषी - मुनी यांना आमंत्रित करून त्यांना मागेल तेवढे गोधन दिले जाईल. पण हा यज्ञ फक्त पुत्रकामेष्टी यज्ञ नव्हता तर एका ब्राम्हणाची, ब्रम्हहत्येचे पातक डोक्यावर घेण्यासारखे होते. त्यामुळे हा यज्ञ कोणीही करण्यास तयार होत नव्हते. तेव्हा द्रुपदला महान तपस्वी ' याज 'आणि ' उपयाज 'या दोन ऋषी बंधु विषयी कळले. द्रुपद ' याज 'आणि ' उपयाज 'या ऋषी बंधूंची सेवा करण्यासाठी त्यांच्या आश्रमात दाखल झाले. प्रथम ते हा यज्ञ करण्यास तयार नव्हते पण द्रुपद राजाची मनोभावें सेवा पाहून शेवटी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास होकार दिला.  (आदिपर्व अध्याय १६६, श्लोक १७ - ३३)




 

पुत्रकामेष्टी यज्ञ

 

यज्ञ करण्याचा दिवस ठरला, सिध्द - ऋषी, तपस्वी ' याज 'आणि ' उपयाज 'या दोन ऋषीनी पुत्रकामेष्टी यज्ञ प्रारंभ केला. मंत्राचे उच्चारण सुरु झाले, हवनात धृताच्या आहुत्या पडू लागल्या, यज्ञातील अग्नी भडकू लागला. तेव्हा काही कालावधीत याज ऋषी म्हणाले," हे राजन, तू मागितले आहे त्या प्रमाणे तुला महान, महातेजस्वी, पराक्रमी, शक्तिशाली पुत्र होईल. तेव्हा उपयाज ऋषी यांनी द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त होवो असा संकल्प केला आणि शेवटची यज्ञात आहूती दिली. याजने स्वतः तो दिव्य प्रसाद तयार केला होता आणि उपयाज यांनी त्या दिव्य प्रसादाला अभिमंत्रित केले होते. पण यज्ञाचा दिव्य प्रसाद घ्यायची जेव्हा वेळ येते तिथे द्रुपद पत्नी सौत्रामणी उपस्थित नव्हते, त्यांना परतण्यास उशिर झाला. याज ऋषी म्हणाले " हे देवी तुम्ही आलात किंवा नाही आलात तरीही हा प्रसाद यजमानांचे कार्य पूर्ण करणारच " असे म्हणून त्या दिव्य प्रसादाची त्यांनी यज्ञाच्या अग्नीतच आहूती दिली.

 

धृष्टधुम्न जन्म 

 

त्या यज्ञातील धगधगत्या अग्नितून एक दिव्य, तेजस्वी, धगधगत्या ज्वाला समान, एक दैवी मनुष्याची आकृती निर्माण होऊ लागली. पिवळा धमक सोनेरी मुकुट मस्तकावर शोभून दिसत होता. त्याचा धिप्पाड शरीरयष्टी, अग्नीसारखा प्रखर, तेजस्वी चेहरा, खांदयावर धनुष्य बाण, आणि हातात खङग धारण केले होते. उपयाज ऋषी म्हणाले " हा अग्निसमान कुमार तुम्हां पांचालांचें दुःख दूर करणार आहे, महाराज द्रुपद यांचे मनोरथ पूर्ण करणार आहे. द्रोणाचार्य वधासाठी याचा जन्म झाला आहे."




 

द्रौपदी जन्म 

 

त्याबरोबरच त्या यज्ञातून एक सुंदर कन्या ही उत्पन्न झाली. ती खूप सुंदर होती. काळेभोर मोठ - मोठे कमळ उमलल्यासारखे डोळे, लांब सडक, काळे, घुंगराळे केश, तिच्या शरीरातून नीलकमलाच्या फुलासारखा सुगंध येत होता. संपूर्ण आर्यावर्तात हिच्या सारखी सुंदर स्त्री कोणीही नाही, सावळी रंगाची श्यामा, कृष्णा, पांचाली, द्रौपदी या नावाने ओळखली जाईल. असे याज ऋषी म्हणाले. पण पांचालनरेश द्रुपद त्या कन्येला स्विकार करण्यास तयार नव्हते, यांना फक्त द्रोण वधासाठी पुत्र हवा होता. तेव्हा याज ऋषी म्हणाले " हे राजन, या पुत्रा सोबतच ह्या देव इच्छानुसार या कन्येचा सुध्दा तू स्वीकार कर, ही कन्या तुझे भविष्य आहे, ही कन्या  तुझ्या शत्रूंचा काळ बनेल, क्षत्रियांचा संहार करण्यासाठी या कन्येचा जन्म झाला आहे. असे म्हटल्यावर द्रुपदाने त्या कन्येचा स्वीकार केला. योग्य वेळी त्या ऋषींनी त्या यज्ञपुत्राचे नाव धृष्टधुम्न असे ठेवले, आणि कन्येचे नाव याज्ञसेनी द्रौपदी असे ठेवले.

 

to be continued....

पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी




 

पांडवांचे आक्रमण आणि द्रुपद बंदी

कौरवांचे पांचालवर आक्रमण केल्यावर पांचालनरेश द्रुपदने प्रतिहल्ला करून कौरव कुमारांना बंदी बनवून टाकले. पण पाच पांडव काही केल्या सापडले नाही. द्रुपदने सर्व सैनिकांना आदेश दिला कंपिल्या नगर व त्याच्या आसपासच्या परिसरात जाऊन त्या पाच कुमारांना शोधून आणा म्हणून आदेश दिला. तेवढ्यात धनुष्यातून बाण सुटावा तसे पाचही वीर पांडव वेगाने पांचाल सेनेकडे येत होते. सर्वात पुढे गदा धारण करून भीमसेन त्याच्या पाठीमागे रथात धनुर्धारी अर्जुन. अर्जुनाच्या रथाच्या पाठीमागे धर्मराज युधिष्ठीर याचा रथ आणि त्याच्या रथाचे रक्षण करणारे खड्गधारी नकुल आणि सहदेव. हा पांडवांचा येणार बाण थेट पांचालच्या सेनेत घुसला.




भीमसेन आपल्या भल्या मोठ्या पोलादी गदेने एखादा मदमस्त पिसाळलेला हत्ती वनांमध्ये घुसून वनांचे जसे नुकसान करतो आणि त्याला आवरणे अशक्य होतं त्याप्रमाणे पांचालचे सैन्य हवेत उडू लागले. आणि त्यातील कोणी जरी वाचले तर त्यांना अर्जुन आपल्या तीक्ष्ण बाणाने वेधून काढी. नकुल, सहदेव आपल्या जेष्ठ बंधू युधिष्ठीर सहित पांचाल सेना कापत कापत थेट द्रुपदच्या रथाला भिडले.

द्रुपद - अर्जुन युध्द

द्रुपद आपल्या चालत्या रथावरून आपल्या धनुष्या द्वारे वर्षा करावी त्या प्रमाणे बाणांची वर्षा करू लागले. पण अर्जुनाने त्याचे उत्तर आपल्या वायू अस्त्राने दिले ते सर्वच्या सर्व बाण हवेतल्या हवेतच भिरकावुन लावले. त्या नंतर अर्जुनाने द्रुपदचा सारथी मारून रथ एका जागेवर स्थिर केला. द्रुपदाने आपल्या भात्यातील एक बाण काढून तो बाण अग्नी अस्त्राने अभिमंत्रित केला, तो बाण अर्जुनाच्या रथावर सोडला. अर्जुनाने हे जाणून धनुष्यावर वरुणअस्त्राचा मंत्र उच्चारला आणि रथाच्या दिशेने येणारा तो अग्नीबाण हवेतच थंड केला. अर्जुनाने चपळता दाखवत द्रुपदच्या हातातील धनुष्य भंग केला. दुसरा धनुष्य घ्यायच्या आत अर्जुनाने पाश अस्त्राने द्रुपदाला रथावरच बंदी केले. जाड अश्या दोरखंडाच्या साहाय्याने द्रुपद बंदी झाला. अर्जुनाने आपल्या कटीवरील खड्ग हातात घेवून रथातून उडी घेतली, आणि थेट चालत तो पांचाल नरेश द्रुपद यांच्या रथावर चढत द्रुपदाच्या गळ्याला हातातील खड्ग लावून सेनेला म्हणाला " थांबा ! पांचालराज द्रुपद बंदी झाले आहेत, सर्वांनी आपले शस्त्र खाली ठेवावे, नाही ठेवले तर आपल्या राजाचे मस्तक धडा वेगळे झालेच समजा."




द्रुपद बंदी

अर्जुनाच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी आपआपली शस्त्रे खाली ठेवली. पांडवांकडून आज पांचाल आज पराभूत झाले होते. युधिष्ठीराने तिथल्या पांचाल सैनिकांना आदेश दिला की " शंभर कौरव बंधूंना त्वरित मुक्त करावे," त्या आदेशाबरोबरच त्यांनी कौरवांना मुक्त केले. बंदी झालेल्या अवस्थेत अर्जुनाने द्रुपदला रथात घातले आणि स्वतःही रथात बसून हस्तिनापूर सीमेच्या दिशेने निघाला. त्या रथा मागे युधिष्ठीर, भीम, नकुल, सहदेव यांची रथ ही निघाले. चर्मण्वती नदी किनारी द्रोणाचार्य आपल्या शिबिरात बसले होते तेव्हा अचानक घोडे आणि रथाचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यांनी पहिले की धनुर्धर अर्जुनाच्या रथात पांचाल नरेश द्रुपद खाली मान घालून दोरखंडाने बंदी झालेला पाहून गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्याना दिलेल्या विद्येचे, शिक्षणाचे सार्थक झाल्याचे समाधान झाले. त्याचबरोबर अर्जुनाने धनुर्विद्येचा उपयोग करून पांचाल सारख्या बलाढय शत्रूचा सुध्दा पराभव केल्याचे पाहून त्यांची छाती गर्वाने भरून गेली.

द्रोणाचार्यांच्या मनात एक विचारांचे वादळ निर्माण झाले. पांचाल नरेश द्रुपदाने भरसभेत केलेला द्रोणाचार्य यांचा अपमान, विद्येचा केलेला उपहास, ते विसरले नाहीत, त्याचाच प्रतिशोध आज पूर्ण झाला. द्रुपदने आपले मस्तक झुकविलेले होते, दोरखंडात त्यांना जखडले होते, एकीकडे नकुल आणि दुसरीकडे सहदेव यांनी त्यांना दोरखंडाच्या साहाय्याने खेचत होते. पांडव द्रुपदाला घेऊन जवळ येताच, जेष्ठ पांडव युधिष्ठीर यांनी प्रणाम करून नम्रपणे म्हणाला " हे गुरुदेव आम्हांकडून आपण सांगितलेली गुरुदक्षिणा स्वीकार करावी." गुरु द्रोणाचार्य खुश होऊन म्हणाले " पांडवांनो तुमचे सदैव कल्याण होवो, यशस्वी भव: " त्यांनी द्रुपदाला दोरखंडातून मुक्त करण्याचा आदेश दिला. गुरु द्रोणाचार्य म्हणाले " हे पांडवांनो, आपली गुरुदक्षिणा मला मान्य आहे. माझ्या मित्राला आता मुक्त करा." द्रुपदने आश्चर्याने आपली मान वर केली त्यांना हे काय होतंय काहीच कळेना. नकुल - सहदेव यांनी पांचाल नरेश यांना दोरखंडाच्या बंधनातून मुक्त केले.




अपमानाचा वचपा 

द्रोणाचार्य उपहासाने द्रुपदाला म्हणाले " हे मित्र द्रुपद, पाहिलंस का ?, मी केवळ मैत्री मागितली होती, तू तर मैत्री सोडच उलट माझा अपमान केला होतास, आणि मला म्हणाला होतास की मैत्री फक्त बरोबरी असणाऱ्यातच होऊ शकते. बघ ! आज मी संपूर्ण पांचाल राज्य जिंकून राजा झालो आहे. पण तुझ्याकडे कुठे राज्य आहे. तू तर माझ्या बरोबर मैत्री करण्यास सुध्दा योग्य राहिला नाहीस, पण मला तुझी केवळ मैत्री हवी होती मित्र द्रुपदा !, तू माझा आणि माझ्या विद्येचा अपमान केला होतास तेव्हा मी शपथ घेतल्या प्रमाणे माझा शिष्यच तुझा पराभव करेल असे म्हणालो होतो ते वचन माझ्या शिष्यानी पूर्ण केले आहे, तू म्हणाला होतास ज्याला राज्य नाही तो राजाचा मित्र असू शकत नाही. म्हणून मी तुझे संपूर्ण पांचाल शिष्यांकरवी जिंकले आहे , या माझ्या पांचाल राज्याचे अर्धे राज्य म्हणजे गंगेच्या दक्षिणेकडील अर्धे पांचाल राज्य तुला देतो. आणि उत्तरेकडील अर्धे पांचाल राज्य मी स्वतःकडे ठेवतो. आता आपण दोघेही राजे झालो आहे. आता आपल्यात मैत्री असण्यात काहीही हरकत नाही."

द्रुपद खजील होऊन, खाली मन घालून चालत आपल्या कंपिल्या नगराकडे निघून गेला.




to be continued....

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...