
मद्र देशावरील संकट
विदुर म्हणतात " सम्राट खूप बिकट परिस्थिती आली आहे आपल्यावर, आपले मित्र राष्ट्र मद्रदेशाकडून मद्रनरेश यांचा संदेश आला आहे की, मद्र देशावर शत्रूंनी आक्रमण केले आहे तरी मित्रत्वाची जाण ठेवुन आपण आम्हाला मदत करावी असा संदेश घेऊन हा दूत आला आहे. तेव्हा माझे मत असे आहे की, आपले आत्ताच विवाह झाला आहे, आपण नव दाम्पत्य झाले आहेत, विवाहानंतर आपणास विश्रांतीही मिळाली नाहीय तर आपण आदेश द्यावे की, दुसऱ्या कोणाला तरी मद्रनरेशच्या मदतीसाठी पाठविण्यासाठी," पांडू म्हणाला "महामंत्री, मी राजाची शपथ घेतली आहे की मी प्रजेचा प्रथम व माझा वयक्तिक सुखाचा नंतर विचार कारेन," शकुनी म्हणाला सम्राट, आपल्या मताशी मी सहमत आहे, आपण स्वतः गेलात तर दोन उद्दिष्ट्ये साध्य होतील एक तर शत्रूवर आपला वाचक बसुन, शत्रू आपआपल्या सीमेत मर्यादेत राहतील, आणि दुसरा म्हणजे आपल्या प्रजेच्या मनात राजाविषयी आदर, प्रबळ राजा, मदतीला धावून जाणारा राजा, मैत्री निभावनारा अशी ओळख निर्माण होईल." पांडू म्हणाला " अगदी बरोबर गांधार कुमार, तेव्हा मी स्वतः शत्रूवर चालून जाईन, कारण शत्रू मला कमकुवत समजत आहे, नवीन राजा, नवीन लग्न, म्हणून शत्रू पण मला पारखू पाहत आहे." भीष्म म्हणाले "सम्राट आपले नवीनच विवाह झाला आहे आपण जाणे ठीक होणार नाही, पण आपण विचार केलाच असेल तर मी आघाडीवर असणार सम्राट आपण फक्त आदेश द्या." पांडू म्हणाला " नाही तातश्री, आपण जर आलात तर आपल्या खांद्यावरच हे साम्राज्य उभे आहे असे प्रजेला वाटेल, आआम्ही असताना जेष्टांना युद्धाला पाठवणे हा अधर्म होईल, आणि एका मित्र राजाचे रक्षण करणे हे दुसऱ्या राजाचे कर्तव्य आहे." अशा प्रकारे पांडूने सर्वांना विनंती पूर्वक सांगितले, व मद्र देशावर झालेल्या शत्रूच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी मलाच जाऊ द्यावे हे पटवुन सांगितले. आणि या दरबारात सर्वानुमते हा निर्णय झाला की, मद्र देशाचे रक्षण करण्यासाठी पांडूने जावे.
मद्र देशाचे रक्षण
पांडू त्वरित आपल्या सेनापतीला आदेश देतात " सेनापती आपल्या सेना त्वरित सज्ज करा मी आत्ताच निघणार आहे " सेनापती जशी आपली आज्ञा म्हणून निघून गेले. राजमाता सत्यवती म्हणाली "पांडू पण तू उद्या प्रातःकाळी पण जाऊ शकतोस." पांडू म्हणाला " होय राजमाता, मी उद्या प्रातःकाळी पण जाऊ शकतो, पण ही माझी कमजोरी होईल आणि शत्रूला मद्रवर आक्रमण करण्यास पूर्ण समय भेटेल, संधी प्राप्त होईल ही अनमोल संधी मला जाऊ द्यायची नाही." पांडू आपली भार्या कुंती हिची भेट घेऊन आपली विशाल सेनेसह मद्र देशाच्या मदतीला जातात.
पांडू - माद्री विवाह
काही काळानंतर पांडू हस्तिनापुरी येतात हस्तिनापूर राजमहालाच्या प्रवेशद्वारी सर्वजण आपल्या विजयी सम्राटाचे स्वागत करण्यासाठी आतुरले होते, कुंती स्वतः आपल्या पतीच्या स्वागताला औक्षण करण्यासाठी सज्ज असते, पांढऱ्या शुभ्र अश्वांचा रथ आणि त्यावर दिसणारे पांडू जणू आकाशात तळपता सूर्य रथावर आरूढ होऊन येत आहे असे भासत होते. रथ जवळ येऊन थांबतो, पांडू रथातून उतरतात, इकडे स्वागताला आलेलले सर्वांच्या मनात आश्चर्य, कुतूहलता, जाणून घ्यायची आशा असते. प्रजाजण आपल्या विजयी राजाचे जयजयकार करतात.
सत्यवती म्हणते, "अभिनंदन पांडू, तुझ्या पहिल्या विजयाचे हार्दिक अभिनंदन." पांडू म्हणतो "धन्यवाद राजमाता." मग कुंती आपल्या पतीचे औक्षण करते, पांडू म्हणतो," कुंती मी तुझ्यासाठी एक भेट वस्तू आणली आहे " असे म्हणून पांडू रथाच्या दिशेने हात करतात, रथातून एक लावण्यवती कन्या उतरते, मंद हास्य करून पांडूच्या मागे मागे चालत राहते, पितामह भीष्म विचारतात " ही कन्या कोण आहे?" पांडू म्हणतो, "तातश्री मद्र देशाच्या मदतीसाठी जाऊन शत्रूला पराजित केल्यामुळे मद्रराज शल्य यांनी मला एक भेट स्वीकारावी लागेल असे वचन घेतल्यामुळे मला त्यांनी आपली भगिनी या माद्री बरोबर माझा विवाह करून दिला आहे त्यामुळे मी ते वचन मोडु शकलो नाही." भीष्म म्हणाले "एक राजा म्हणून तु योग्यच वागला आहे, पण एक पती म्हणून हा कुंतीवर अन्याय झाला आहे पांडू." तेव्हा पांडू काही बोलण्याच्या आधी माद्री सरळ जाऊन कुंतीच्या चरणाजवळ बसुन म्हणते "माफी करावे दीदी, माझ्या शल्य बंधूला या विषयी खरंच माहिती नव्हते " पण मी वचन देते की, मी आपला शब्द कधीच मोडणार नाही, सदैव आपल्या आज्ञेत राहीन." कुंती माद्रीच्या हाताला धरून उठवते आणि म्हणते, " तु मला दीदी पण म्हणतेस आणि माफी पण मागतोस या मध्ये तुझा काहीही दोष नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, आता तु या हस्तिनापूर साम्राज्याची राणी आहेस, असे दासी सारखे कृत्य करणे राणीला शोभत नाही." माद्री म्हणते " नाही दीदी, मी तुमची आणि आर्यची दासी म्हणूनच सदैव सेवा करेन " अशा प्रकारे माद्रीने सर्व जेष्ठ मंडळी, आणि कुंतीचे मन जिंकल्यावर मोठ्या आनंदाने राजमहालात प्रवेश करतात. पण कुंतीच्या मनात आपल्या हक्काच्या, अधिकाराच्या माणसावर कोणी दुसरा पण हक्क सांगतो हेच शल्य कुठेतरी बोचत होते.
इकडे पुढे काही दिवसातच पांडूने संपूर्ण आर्यावर्तातील सर्व राष्ट्रांवर आक्रमण करून, संपूर्ण दिग्विजय केला आणि युद्धात अमाप संपत्ती गोळा करून आपल्या हस्तिनापूर साम्राज्याची कीर्ती अधिकच गाजविली. पण या मद्र वरील आक्रमन रोखने, आर्यावर्तात दिग्विजय या युद्धामुळे पांडुस थकवा जाणवू लागला होता. (आदिपर्व अध्याय ११३ - ११४)
पांडूचा आपल्या दोन्हीं पत्नी समवेत वनविहार
दुसऱ्या दिवशी राजमाता सत्यवती पांडूच्या महालात येतात आणि म्हणतात " पांडू गेली कित्येक महिने आम्ही तुझी वाट पाहत होतो, तू कुंतीच्या विवाह नंतर लगेच मद्रराज यांच्या मदतीला गेलास, आता या युद्धामुळे, धावपळीमुळे खुप थकवा तुझ्या मुखावर स्पष्ट्पणे दिसत आहे. तेव्हा तू आणि तुझ्या दोन्ही पत्नीं सोबत वनामध्ये विहारास जावे तेवढाच तुझा थकवा जाईल." पांडू म्हणाला " पण राजमाता... " पांडू काही बोलायच्या आत सत्यवती म्हणाली " हे पहा पांडू कुंतीच्या विवाहानंतर पहिल्या रात्रीच तू युद्धासाठी निघून गेलास, आता माद्रीच्या वेळेस पण तू राजकारभाराच्या गोंधळात न पडता लगेच वनात मनःशांती, शरीराचा थकवा घालवावा अशी माझी आज्ञा आहे." पांडू म्हणाला जशी आपली आज्ञा म्हणून पांडू वनामध्ये जाण्यास तयार झाला. पांडूने पितामह भीष्म महामंत्री विदुर,जेष्ठ धुतराष्ट्र, कुलगुरू कृपाचार्य यांच्याशी विचारविमर्श करून दोन्ही पत्नी समवेत वनात विहार करण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी महाराज पांडू, आपली पत्नी कुंती आणि माद्री समवेत वनामध्ये मन व शरीराचा थकवा घालविण्यासाठी निघतात. पांडू हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शालवृक्षाच्या जंगलामध्ये राहू लागले.
विदुर विवाह
इकडे भीष्मांनी देवक राजाच्या इथे विदुराच्या विवाहासाठी एका कन्येसाठी मागितले, आणि देवकांनी त्याला सहमती पण दिली, तेव्हा भीष्मांनी विदुर आणि पारसवीदेवी यांचा विवाह करून दिला. विदुर दासी पुत्र असल्याने पारसवीदेवी ही कन्या पण एका शूद्र स्त्रीच्या गर्भपासुन, ब्राम्हण द्वारे निर्माण झालेली सुशिल कन्या होती.
to be continued....