रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

पांडू आणि कुंती यांचे हस्तिनापूरमध्ये आगमन

 


कुंतीचे स्वयंवर पांडूने जिंकल्यावर, महाराज कुंतिभोज यांनी पांडू व कुंती यांचा विधिवत विवाह केला, आणि काही दिवस राहून, सम्राट पांडू हस्तिनापुरी जातात, तिथे महाराज पांडूला हे समजले की, कुंती ही महाराज कुंतिभोज यांची कन्या नसून तर ती यदुवंशीच्या वृष्णी कुळातील शूरसेन व मरीषादेवी या दांपत्याची एक कन्या आहे, शूरसेन यांना वसुदेव हा एक पुत्र आणि पृथा, राजाधिदेवी, श्रुतकिर्ती, श्रुतदेवी, श्रुतश्रवा या पाच कन्या, महाराज कुंतिभोज हे शूरसेन यांचे आतेबंधू, कुंतिभोज यांना कोणतेही आपत्ये नसल्याने त्यांनी पृथाला दत्तक घेतले होते. तेव्हा तिचे नाव पृथा वरून कुंतिभोज यांची कन्या म्हणून कुंती असे पडले.

काही दिवसांनी पांडू कुंतिभोज राजाकडे येऊन हस्तिनापूर राज्याकडे प्रस्तानसाठी आज्ञा द्यावी अशी विनंती करतात. कुंतिभोज राजा मोठ्या अंतःकरणाने कुंतीला निरोप देतात. महाराज पांडू हस्तिनापूरकडे निघाले तेव्हा कुंतिभोज राजाने अमाप संपत्ती, दागदागिने, दास - दासी, इ. आपल्या सोबत घेऊन कुरुराष्ट्राकडे निघाले, पांडूनी आपल्या राजपरिवारातील सर्वांचे वर्णन करून सांगिलते.

कुंतीचे हस्तिनापुरात आगमन

इकडे हस्तिनापूरमध्ये पांडूनी स्वयंवर जिंकल्याची वार्ता साऱ्या हस्तिनापूरमध्ये पसरली होते. तेव्हा ही वार्ता अगोदरच सर्वांना पोहचली असल्याने, हस्तिनापूरच्या मुख्य महाद्वाराजवळ जेव्हा पांडू आणि कुंती आले तिथे यांच्या स्वागताला स्वतः महामंत्री विदुर आले होते, त्यांनी सहर्ष पांडूचे स्वागत केले, " महाराज पांडू, आणि राणी यांचा विजय असो !" तेव्हा पांडू म्हणाले " हे राजशिष्टचार राहू दे विदुर, पहिले सांग तुझ्या वाहिनीचे स्वागत नाही करणार का ?",विदुर म्हणाला," हो भ्राता, आमच्या वाहिनीचे स्वागत आम्ही स्वताः त्यांच्या रथाचे सारथ्य करून स्वागत करणार." मग विदुर पांडूच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या अधिरथ यांना म्हणाले, "अधिरथ आपण प्रवास करून थकला असाल तेव्हा आपण आराम करावे." अधिरथ म्हणाले "जशी आपली आज्ञा महामंत्री." अधिरथ रथातून उतरून, महाराज पांडू यांची परवानगी घेऊन निघून जातात. विदुर स्वता: पांडू आणि कुंती यांच्या रथाचे सारथ्याच्या आसनावर बसुन, "आज्ञा द्यावे राज्ञी." पांडू हसत म्हणाला "आज्ञा द्यावे राणी " कुंतीही हसून म्हणाली " चला विदुर भावजी."

तेव्हा विदुर आपल्या भ्राता आणि वाहिनी सोबत मुख्य राजमहालाकडे जातात, तिथे स्वागताला राजमाता सत्यवती, पितामह भीष्म, माता अंबिका आणि अंबालिका, कुलगुरू कृपाचार्य, गांधारी हे सर्व पांडूने स्वयंवरात जिकंलेल्या कुंतीच्या स्वागताला सज्ज होते. गांधारीने पांडू व कुंतीचे औक्षण करून कुंतीला म्हणते, "मी गांधारी, हस्तिनापूर सम्राज्ञी कुंतीचे स्वागत करते," कुंती म्हणाली, "नाही दीदी, आपण माझ्यापेक्षा मोठ्या आहात, आपण मला फक्त कुंतीच म्हणा आणि आपण माझे स्वागत केलात त्याबद्दल धन्यवाद. तेव्हा पांडू व कुंतीने सर्व थोरांचे आशीर्वाद घेऊन, राजमाता सत्यवतीला म्हणतात, "जेष्ठ नाही आले, अजुन मनातून राग गेलेला दिसत नाही." सत्यवती म्हणाली "मी समजावुन सांगेन धृतराष्ट्राला," पांडू म्हणाला "नाही राजमाता मीच त्यांची भेट घेणार, प्रथम आपल्या इष्ट देवतेचे दर्शन घेऊन येतो. पांडू आणि कुंती दोघेही इष्ट देवतेला प्रणाम करण्यासाठी मंदिराकडे जातात. अशा प्रकारे कुंतीचा राजमहालामध्ये प्रवेश होतो. त्या दिवशी संपूर्ण हस्तिनापूरमध्ये सर्वत्र आनंदी आनंद साजरा केला जातो. त्या निमित्याने पांडूने भरपूर प्रमाणात दानधर्म करतात.

मद्र देशावर शत्रूचे आक्रमण

कुंती पांडूच्या राजमहालामध्ये बसलेली असताना, आपल्या पहिल्या पुत्राची, आठवण येते, तो कोठे असेल ?, तो कसा असेल ?, तो वाचला असेल का ? आपण त्या विषयी पांडूला आर्यांना सांगावे का ?, ते काय म्हणतील असे अनेक प्रश्न कुंतीच्या मनात येऊ लागतात. तेव्हा पहारेकरी आरोळी देतात, " सावधान, सम्राट पांडू येत आहेत हो." कुंती आपल्या विचार चक्रातून जागृत होते. सम्राट पांडू आपल्या राजमहालात प्रवेश करतात, पांडू कुंतीला म्हणतात, "कुंती तुला हे आमचे हस्तिनापूर कसे वाटले, तुला आवडले का ?" कुंती म्हणाली, "आर्य आमच्या कुंतिभोज पेक्षा खुपच मोठे आहे आणि महान सुद्धा." पांडू म्हणाले, "कुंती तूला स्वयंवरा पासून मला काही बोलायचे होते पण समयच नव्हता " कुंती खाली पाहत म्हणाली," बोला आर्य कशा बद्दल बोलायचे होते." तू स्वयंवरात असा का प्रश्न विचारला होतास ? काय जाणून घ्यायचे होते तुला ?" कुंती म्हणाली "महाराज मला हृदयाची खोली जाणून घ्यायची होती." पांडू म्हणाला "पण स्वयंवरात तुला मनाचे समाधान करून घ्यायचे होते ना." कुंती म्हणाली "मला हृद्याबरोबरच, बुध्दीची पण परीक्षा करायची होती." मग मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो का ?" कुंती म्हणाली " हो आर्य, आपण उत्तीर्ण पण झालात आणि आपल्या मोठ्या मनाची पण कल्पना आली." आणि अचानक पहारेकर्यांनी सर्वांना सावध करण्याचे नागरे वाजवले. पांडू सावध होऊन " नगारे एवढ्या समयानंतर वाजतायेत म्हणजे हे काहीतरी मोठे संकट असले पाहिजे." कुंती घाबरून म्हणाली " संकट ! आता, ते कसले आर्य." पांडू म्हणाला "माहिती नाही कुंती पण संकट आहे, मला त्वरित राज दरबारात जावे लागेल. आणि असे बोलून पांडू राजदरबाराकडे निघून जातात पण इकडे कुंतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते." तिथे अगोदरच राजमाता सत्यवती, पितामह भीष्म, जेष्ठ धृतराष्ट्र, महामंत्री विदुर आले होते, पांडू राजदरबारात येतात, आणि जाऊन सिहासनावर विराजमान होतात आणि विदुरकडे पाहून म्हणतात "महामंत्री कोणते संकट आले आहे हस्तिनापुरवर." विदुर म्हणतात " सम्राट खूप बिकट परिस्थिती आली आहे आपल्यावर, आपले मित्र राष्ट्र मद्रदेशाकडून मद्रनरेश यांचा संदेश आला आहे की, मद्र देशावर शत्रूंनी आक्रमण केले आहे तरी मित्रत्वाची जाण ठेवुन आपण आम्हाला मदत करावी असा संदेश घेऊन हा दूत आला आहे."

 to be continued...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...