रविवार, २५ डिसेंबर, २०२२

द्रोणाचार्यांची गुरुदक्षिणा

 

गुरु द्रोणाचार्यांनी रंगभूमी वरील शक्ती प्रदर्शन केल्यानंतर सर्वांच्या शक्ती, बुध्दी आणि बल, यांचा परिचय झाला होता त्यांनी असे ठरवले की मागील बारा वर्षांपासून कुरु कुमार आश्रमात राहून विद्या ग्रहण करून तयार झाले आहे. त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता वेळ आली होती ती गुरुदक्षिणेची.




द्रोणाचार्यांची गुरुदक्षिणा

गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्याना बोलवून सांगितले की " माझ्या प्रिय शिष्यांनो तुमच्या सर्वांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आता तो समय आला आहे, की शिष्यांनी गुरु इच्छित आपल्या आचार्यांना  गुरुदक्षिणा देण्याची." तेव्हा सर्व शिष्य म्हणाले " सांगा आचार्य, आपण सांगाल ती गुरु दक्षिणा आम्ही देऊ आपणास काय हवे आहे सुवर्ण, माणिक, मोती, गायी, भूमी, काय हवे आहे ते आम्ही आपल्याला दक्षिणा स्वरूपात देऊ." आचार्य द्रोण हसून म्हणाले " मला या पैकी काहीही नको आहे, मी जे मागणार आहे ते कोणी एक शिष्यच काय तर तुम्ही संपूर्ण शिष्य मिळून ती ईच्छा पूर्ण करेल की नाही ही शंका आहे मला, माझी एकाच ईच्छा आहे की, पांचाळ नरेश, द्रुपदला युध्दात बंदी करून माझ्या समोर उभे करावे हीच माझी सर्वोत्तम दक्षिणा असेल, कोण पूर्ण करेल माझी ही ईच्छा "

सर्व कुरु कुमार ही अजब गुरु दक्षिणा ऐकून आश्चर्य चकित झाले, कारण पांचाल नरेश द्रुपद काही साधा राजा नव्हता तर हस्तिनापूर सारखेच खूप जुने आणि महापराक्रमी योध्दे या राजघराण्यामध्ये जन्मले होते. हस्तिनापूर सारखेच विशाल आणि सुरक्षित असे राज्य आणि तेवढीच सुरक्षित त्यांची

पांचाल नरेश द्रुपद

त्या राज्याचा राजा महाराज द्रुपद हा महान ऋषी भारद्वाज आणि अग्निवेश यांच्या आश्रमात राहून द्रोणाचार्य सोबत विद्या ग्रहण केली होती. म्हणजेच द्रोणाचार्य यांच्या समान ते योध्दे होते. विविध अस्त्र आणि शस्त्र धारण करणारे द्रुपद यांना जिंकून बंदी करणे खुप अशक्यप्राय होते. गुरु द्रोणाचार्य यांच्या या आगळ्या वेगळ्या दक्षिणेला प्रथम कोणी होकार दिला नाही, पण लगेच अर्जुन आपल्या हातातील धनुष्य आकाशात उंचावून म्हणाला " आचार्य मी त्या पांचाळधिश द्रुपद यास बंदी करून आपल्या चरणांवर टाकेन." गुरु मनातुन आनंदी झाले. अर्जुनाने असे म्हटल्या बरोबर दुर्योधन, दुःशासन, इत्यादी अनेकांनी " मी त्यास बंदी करेन, मी त्यास बंदी करेन, असे मोठमोट्याने कोलाहल करू लागले.




द्रोणाचार्य म्हणाले " पांचाल नरेश द्रुपद बरोबर युध्द करून त्यास बंदी बनवणे एवढे सोप्पे नाहीये, हस्तिनापूर सारखेच ते एक समृध्द राज्य आहे. द्रुपद माझ्या सारखाच शूर, वीर, क्षत्रिय आहे विविध शस्त्र तो चालवू शकतो. धनुर्विद्येत माझ्या एवढीच त्यालाही अस्त्र ज्ञात आहेत. उत्तरेस हिमालयापासुन दक्षिणेस चर्मण्वती नदी पर्यंत, पूर्वेला कुरु, मत्स्य, शूरसेन हे राज्य आणि पश्चिमेला नैमिषारण्य अशा या विस्तृत भूमीवर पांचाल राज्य आहे. 'कंपिल्यनगर' ही पांचाल राज्याची राजधानी, द्रुपद याची सैन्य संख्या दोन अक्षौहिणी सेना आहे एक्केवीस हजार, आठशें सत्तर रथ, एक्केवीस हजार, आठशें सत्तर गज, आणि एक लाख, नऊ हजार, तीनशे पन्नास सैनिक, पासष्ठ हजार, सहाशे दहा अश्व, येवढे सैन्य म्हणजे एक अक्षौहिणी या सैन्याच्या दोन पट द्रुपदकडे सैन्यबळ आहेत. या बरोबरच त्याचा सेनापती शिखंडी हा सुध्दा अजेय आहे. सुमित्र, प्रियदर्शन, व्याघ्रदत्त, चित्रकेतू, शत्रूंजय इत्यादी अनेक द्रुपद पुत्रांच्या संरक्षणामध्ये पांचाल नरेश द्रुपद असणार या सर्वांचा पराभव करूनच द्रुपद पर्यंत तुम्ही पोहचु शकता."

विकर्ण म्हणाला " आचार्य आपण हे सांगुन आमचा आत्मविश्वास कमी करताय का ?" द्रोणाचार्य म्हणाले " नाही विकर्ण मी तुमचा आत्मविश्वास नाही कमी करत पण शत्रूचे बल मापन करून प्रहार करणे केव्हाही योग्य ठरेल. तर सर्व शिष्यानो उद्या सूर्योदयासमयीं युध्दासाठी शस्त्र - अस्त्र सहित आपण हस्तिनापूरच्या सीमेवर जाणार आहोत आणि जर कोणाला या भयंकर युध्दाचे भय वाटत असेल तर त्याला मी गुरुदक्षिणेच्या दायित्वातून आत्ताच मुक्त करतो. उद्या प्रातःकाळी आपण चर्मण्वती नदी किनारी आपले शिबीर असणार आहे तिथेच आपण भेटू या ." असे म्हणून द्रोणाचार्य निघून गेले. कौरव आणि पांडव हे रात्री उशिरा पर्यंत उद्याच्या युध्दात पांचाल नरेश द्रुपद यांच्या बरोबर कोण, कसे लढावे याचे नियोजन, युद्धनिती आखत करत होते.




युध्दाची तयारी 

दुसऱ्या दिवशी पहाटेच द्रोणाचार्यांचे सर्व शिष्य आपआपल्या शस्त्र - अस्त्रे धारण करून आपल्या विविध पताका आणि अश्वांनी युक्त रथांवर आरूढ होऊन सूर्योदयापूर्वीच चर्मण्वती नदी किनारीला असलेल्या शिबिरात पोहचले, सर्व शिष्य आपआपल्या रथातून उतरून शिबिरासमोर आले, त्या अगोदरच आचार्य द्रोण तिथे आलेले होते. त्यांनी त्या रथांमधून येणाऱ्या शिष्यामध्यें अंगराज कर्ण पण आलेला पाहून कपाळावर आठ्या निर्माण झाल्या, शिष्य जवळ येताच सर्वांनी आचार्यांना प्रणाम केला. द्रोणाचार्य म्हणाले " प्रिय शिष्यांनो, ही जी गुरुदक्षिणा मी मागत आहे ती माझ्या शिष्याकडे मागत आहे. जो माझा शिष्य नाही त्यांनी गुरुदक्षिणा देण्याचा प्रश्नच येत नाही, या सामर्थ्याच्या परीक्षेत भाग घेऊ नये. त्यांनी परत हस्तिनापुरी सन्मानाने जावे आणि मी दिलेल्या विद्येच्या, शिक्षणाच्या बळावर माझे शिष्य गुरुदक्षिणा देण्यास समर्थ आहेत, असें मला वाटते इतर कोणत्या राजाची मदत माझ्या शिष्यांनी घेऊ नये." तेव्हा सर्व जण विजय धनुष्य धारण केलेल्या अंगराज कर्ण यांच्याकडे पाहत होते. अपमान झालेला अंगराज कर्ण कोणाला काहीही न बोलता परत हस्तिनापुराकडे निघून जातो.

द्रोणाचार्य सर्वांना युध्दासाठीच्या सूचना देत होते, द्रोणाचार्य म्हणाले " ही समोर असलेली चर्मण्वती नदी ओलांडली की पांचालचे राज्य सुरु होते. मला फक्त जिवंत द्रुपद माझ्या समोर बंदी झालेला हवा आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या सामर्थ्याचे परिचय पांचालनरेशला देऊन त्याचा अहंकार नष्ट करा, यशस्वी व्हा, प्रस्थान करा."

to be continued....

कर्ण - अर्जुन यांचे द्वन्द्व

 


राजमाता कुंती मूर्च्छित




द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांच्या साहस, शक्ती, आणि सामर्थ्याचे प्रदर्शन आता वेगळेच रूप घेऊ लागले होते. तेवढयात एक सैनिक धनुर्धारी अर्जुनाच्या जवळ येऊन कानात काहीतरी सांगितले आणि तो राजपरिवारातील स्त्रीयांसाठी जे प्रेक्षकालय तयार केले होते त्या दिशेने जाऊ लागला. तिथे माता गांधारी, भगिनी दु:शला, गुरुमाता कृपी आणि इतर राजपरिवारातील स्त्रिया होत्या, अर्जुन जाताच तिथे दासीच्या घेऱ्यामध्ये राजमाता कुंती मूर्च्छित अवस्थेत पडलेल्या होत्या. मूर्च्छित होण्या अगोदर कुंतीने कर्णच्या शरीरावरील लक्षणांवरून म्हणजे पिवळा धमक शरीराचा रंग, कुरुळे केश, जन्मताच असणारे अभेद्य कवच आणि कानातील मांसल कुंडल या वरून ओळखले की हा तर माझाच पुत्र आहे. महर्षी दुर्वासा यांच्या सेवेने प्रसन्न होऊन मिळालेल्या प्रथम मंत्राचा प्रभाव, प्रथम देवता भगवान सूर्यनारायण यांचा कृपा आशीर्वाद, मंत्राचे खरेपणा जाणून घेण्याची उत्सुकता, या सर्वांचे कारण मी आणि माझे कर्म हे कुंतीला स्पष्ट दिसत होते. त्याचाच परिणाम आता आपल्याच दोन्ही बंधूंमध्ये कोणी तरी एक राहणार आणि एक जण मरण पावणार हे घडणार होते, ती देवांकडे सतत प्रार्थना करत होती, गप्प बसावे की मोठ्याने ओरडून सर्वाना सांगावे की हा कर्ण माझा पुत्र आहे,

राधापुत्र नव्हे कुंतीपुत्र, अधिरथ पुत्र नव्हे पांडू पुत्र, सूतपुत्र नव्हे सूर्यपुत्र, सारथी नव्हे क्षत्रिय, अंगराज नव्हे तर हस्तिनापूर नरेश होण्याचा ज्याचा हक्क तो नाही मिळू शकला. किती हालअपेष्ठा, लोकांची बोलणी किती सहन केले असेल या विचारानेच ती कोमेजून जायची पण सध्या या रंगभूमीवर कसे व कोणाला कसे सांगणार या मुळे ती शांत राहिली, पण आपलेच दोन्ही पुत्र एकमेकांसमोर धनुष्यबाण घेऊन एकमेकांचे प्राण घेणार याचा विचार करूनच ती मूर्च्छित झाली.

रंगभूमीवर सर्व कुमारांच्या शस्त्रांचे प्रदर्शना बरोबर, कर्णचे राज्यभिषेक, आणि आता कुरु कुमार अर्जुन बरोबर द्वन्द्व असे लगेच क्षणाक्षणाला चित्र पालटू लागत होते, द्वन्द्व हे अटळ झाले होते. अर्जुन आपल्या कुंती माता यांचा आशीर्वाद घेऊन परत आला होता. दुर्योधन कर्णाला म्हणाला " मित्र, आता तुला अर्जुन बरोबर द्वन्द्व करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही."




कर्ण - अर्जुन यांचे द्वन्द्व

" थांबा ! सुर्यास्था नंतर अशा समयी द्वन्द्व करणे, शास्त्रात निषिध्द मानले गेले आहे." - कुलगुरू कृपाचार्य.

कर्ण आणि अर्जुन यांचे द्वन्द्व सुरु होणार होते, दोघेही आपआपल्या पाठीवरील भात्यातील एक एक बाण काढून धनुष्यावर संधानासाठी सज्ज केले होते तेवढ्यात सूर्य नारायण अस्ताला पोहचले होते. तरी सुध्दा त्या रंगसभेतील हस्तिनापूर नागरिकांमध्ये आता परस्पर विरोधी, सरळ सरळ दोन गट निर्माण झालेले दिसत होते, एक गट ' अंगराज कर्णचा विजय होवो !' असे म्हणत होते तर एक गट ' पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो !' असे घोषणा देत होते सारी रंगभूमी अशा घोषणांनी दुमदुमून गेली होती. तेव्हा कुलगुरू कृपाचार्य म्हणाले " थांबा ! सुर्यास्था नंतर अशा समयी द्वन्द्व करणे, शास्त्रात निषिध्द मानले गेले आहे." तेव्हा कर्ण आणि अर्जुन दोघेही आपआपल्या स्थानावर स्तब्ध राहिले. गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या हातातील पांढरा शुभ्र शंख मोठ्याने फुंकला आणि शिष्यांच्या सामर्थ्याची परीक्षा, शक्तीचे प्रदर्शन समाप्त झाल्याचे जाहीर केले. काही क्षणात रंगभूमीवर अंधार पसरला, हस्तिनापूर नगरातील प्रजा धनुर्धर अर्जुनाचे गुणगान करत होती, तर काही अंगराज कर्णची वाहवा, तर तिसरा गट अंग देशाला योग्य राजा मिळवुन दिला, अंग देशाचे मगध पासुन रक्षण केले, अर्जुनाला शह देण्यासाठी कर्णला आपल्या बाजूने घेतले, आपण जातीयता मानत नाही हा संदेश प्रजेला दिला, आपण किती कृपाळू आहे हे कृतीतून दाखवून दिले, अशाप्रकारे दुर्योधनाचे वागणे कसे बरोबर होते हे सांगत होते.




रंगभूमी हळूहळू रिकामी होऊ लागली आता प्रजा आपआपल्या निवास स्थानी निघून गेल्यावर सर्व राजपरिवारातील, स्त्री - पुरुषही निघून गेले. पाच पांडव आपले गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य सोबत निघाले. कौरव ही अंगराज कर्ण बरोबर अंधारातुन मशालाच्या प्रकाशाने वाट काढत हस्तिनापूर राजवाड्याकडे निघून गेले.  (आदिपर्व अध्याय १३६, श्लोक १६ - २५).

 

to be continued....

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

सुतपुत्र ते अंगराज कर्ण

 


तू कोण ?, तू आपला परिचय दे, कोणत्या महान कुळातील तू ?, तुझे माता - पिता कोण ? या प्रश्नाचे उत्तर त्या युवकाला सांगता आले नाही. आचार्य द्रोण कृपाचार्यांना बोलले " कुलगुरू नदीचे मूळ आणि वीर योध्याला त्याचे कुळ आपण विचारू नये. कसातरी धीर करून तो युवक काही तरी बोलणार तोच दुर्योधन आपल्या सिंहासनावरून बोलला. " कुलगुरू, शूर - वीरांचे सामर्थ्य हेच त्याचे परिचय अन्य परिचय गौण आहेत." कुलगुरू कृपाचार्य म्हणाले, " एका सामान्य, कमी दर्जाच्या व्यक्ती बरोबर राजघराण्यातील क्षत्रिय कुमार का द्वन्द्व करावे ?" त्या युवकाची आता खूप घुसमट झालेली स्पष्ट दिसत होते. तो त्या त्रासाने बोलला " हो ! हो ! हो ! मी सामान्य कुळातीलच आहे. इथल्या हस्तिनापूर नगरातील सर्व जनतेच्या, प्रजेच्या समोर सांगतो की, मी माता राधा आणि पितामह भीष्माचार्य यांचे सारथी अधिरथ याचा पुत्र कर्ण आहे."

 




अधिरथ पुत्र कर्ण

 

कर्ण ! कर्ण ! कर्ण ! त्या सर्व रंगभूमीमध्ये एकाच नाव घुमू लागले. हा तर सूतपुत्र !, याने का शस्त्र धारण केले आहे ?, निघुन जा कर्ण, तु  सूतपुत्र आहेस, चालत हो साऱ्या मैदानांत तो आवाज घुमू लागला होता. कर्ण जिवाच्या आकांतानं सांगत होता की मी का लढू शकत नाही ? फक्त सूतपुत्र आहे म्हणून ? पण त्याचा आवाज त्या गोंधळात कोणालाही ऐकू गेला नाही. एका क्षणापुर्वी कर्णचा जयजयकार करणारी प्रजा, दुसऱ्या क्षणी त्याचा धिक्कार करू लागली. तेवढ्यात रंगभूमीचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रजेमध्ये बसलेले अधिरथ गर्दीतून वाट काढत कर्ण जवळ आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्यांनी हात जोडत सम्राट यांना म्हणाले," सम्राट माझ्या पुत्राला क्षमा करा, मी याला येथून घेऊन दूर जाईन, कृपा करा पितामह, क्षमा करा." अधिरथ सारथी वारंवार विनवणी करू लागले. कर्ण म्हणाला " नाही, तातश्री मी या अर्जुनाला आज हरवून या हस्तिनापूर प्रजेला दाखवून देईन की हा सुतपुत्रच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे ते." अधिरथ बोलले " नाही कर्ण, तुझे आणि माझे आपले प्राण प्रिय असेल तर चल येथून." तेव्हा भीमसेन अभिमानाने बोलला, " निघून जा सूतपुत्र, आपल्या पिताश्रीचे म्हणणे ऐक जरा त्यांना माहित आहे की सुतामध्ये शक्ती नसते. रथाचे सारथ्य करणे आणि अश्वांचे देखभाल करणे हे तुझे काम आहे, द्वन्द्व करणे हे क्षत्रियांचे काम आहे सुतपुत्राचे नाही, हातातील धनुष्यबाण सोडून प्रतोद ( चाबूक ) घेऊन रथशाळेत जा त्वरित." भीमाच्या या शब्दाने कर्णला त्याचा अधिकच राग आला, पण तो नेहमी प्रमाणे आपला अपमान सहन करून पिताश्री बरोबर जाऊ लागला.

 




दुर्योधनने घेतली कर्णची बाजू 

 

दुर्योधन गरजला " एक राजाची योग्यता त्याच्या जन्म, धैर्य व सेनानायकत्व या तीन गुणांवर ठरवायची असते. केवळ उत्तम कुळात जन्म झाल्याने योग्यता येत नाही." मला कुलगुरू यांना एक प्रश्न विचारायचा आहे, ब्राम्हण कुळातील रावणाने आव्हान दिल्यावर क्षत्रिय कुळातील प्रभू रामाने ते का स्वीकारले ?, राक्षस कुळातील वृषपर्वा यांच्या समोर आमच्या कुळातील दुष्यन्त यांनी युध्द का केले होते ? त्यांची कुळे वेगवेगळी होती मग या शूर कर्णला का वेगळा न्याय दिला जातोय ? कारण तो एक सूतपुत्र आहे म्हणून." कुलगुरू कृपाचार्य म्हणाले " हे दुर्योधना, दशानन रावण आणि वृषपर्वा हे कोणत्या ना कोणत्या तरी प्रदेशाचे राजा होते." दुर्योधन त्यांचे वाक्य मध्येच तोडत म्हणाला " म्हणजे हा कर्ण जर कोणत्या तरी देशाचा, प्रदेशाचा राजा असेल तर तो या अर्जुनाला आव्हान देऊ शकतो बरोबर ना कुलगुरू," कुलगुरू कृपाचार्य सम्राट धृतराष्ट्र यांच्याकडे पाहत " हो, नाही " असे काही बोलायच्या आत दुर्योधन मोठ्याने बोलला " हस्तिनापूर पासून दूर असलेल्या मगध साम्राज्याच्या जवळ अंग प्रदेशाची भूमी पितामह भीष्माचार्यांनी फार पूर्वी जिंकली होती त्या जिंकलेल्या भूमीला, प्रदेशाला राजा नव्हता, म्हणून मी आज पासून कर्णला अंग देशाचा राजा बनवतो." असे म्हणून त्याने जवळ उभे असलेले सर्व सैनिकांना भराभर आदेश देऊन एक सुवर्ण सिंहासन, राजभिषेकासाठी लागणारे पवित्र नद्यांचे जल, फळ, पुष्प, गंध, वस्त्रे, सुवर्ण अलंकार, मुकुट, सोन्याच्या मोहरा, मानाची खङग, ध्वज, रथ, इत्यादी सर्व काही त्या रंगभूमीमध्येच मागून घेतले.




 

कर्णचा राज्यभिषेक 

 

काही कळायच्या आत दुर्योधनाने कर्णच्या हाताला धरून सुवर्ण सिंहासनावर बसविले जवळ उभ्या असलेल्या ब्राम्हणाला राजभिषेकाचे पठण चालू होते, पवित्र नद्यांचे जल कर्णच्या डोक्यावरून वाहत होते, दूध, दही, इत्यादींचा अभिषेक होत होता. शेवटी दुर्योधनाने आपल्या हातातील मानाच्या खङगावर आपला अंगठा बोट दाबले आणि आलेल्या रक्ताच्या थेंबाने दुर्योधन म्हणाला " मित्र कर्ण आता तू अंगदेशचा राजा झाला आहेस, या माझ्या रक्ताच्या साहाय्याने मी शपथ घेतो की मी सदैव तुझ्यासोबत राहीन." कर्णच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागले होते, तो म्हणाला " हे कुरु कुमार मी फक्त माझ्या धनुर्विद्येला मानसन्मान मिळविण्यासाठी आलो होतो आपण तर मला एक राजा बनवून टाकलात. मी या बदल्यात आपल्याला काय भेट देऊ ?" दुर्योधन म्हणाला " हे मित्र अंगराज कर्ण तू मला फक्त आपला मित्र बनव, आणि आपली मैत्री कायम अशीच अनंत काळापर्यंत टिकून राहू देत." असे म्हणून दोघेही एकमेकांनी हृदयभेट घेतली.

 

to be continued....

रंगभूमीचे प्रदर्शन आणि सुतपुत्र

 

अर्जुनाची धनुर्विद्या प्रदर्शन

रंगभूमीवर अर्जुनाने आपले धनुर्विद्येतील कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाला. त्यांने सर्वांना  वंदन केल्यावर प्रथम अर्जुनाने आग्नेय अस्त्राने त्या रंगभुमीवर सर्वत्र आग्नि प्रदीप्त केला. त्या अग्नीने सर्व नगरजण भयभीत झाली तो अग्नी अर्जुनालाही भस्म करून टाकेल असे वाटताच अर्जुनाने पाठीमागील भात्यात हात घालून एक बाण काढला वीरासन घालुन धनुष्यामध्ये लावुन मनात काही मंत्र पुटपुटून तो बाण आकाशात सोडला. आणि काय आश्चर्य आकाशात सर्वत्र काळेभोर ढग निर्माण झाले. कोणत्याही क्षणी वर्षा होईल असे वातावरण निर्माण झाले. मध्येच एक जोरदार वीज चमकून तो अग्नी शांत करण्यासाठी अर्जुनाने वरुण अस्त्राचा प्रयोग केला होता.





सर्वत्र अर्जुनाचा विजय असो ! जय हो अर्जुन ! असे जयजयकार चालु होते. त्या जलाने तो अग्नी शांत झाला तेव्हा अर्जुनाने पर्जन्यास्त्राचा उपयोग करून सर्व नगरजण यांना जल वर्षावाने चिंब भिजवून टाकले. तेव्हा लगेच भात्यातील बाण काढुन वायव्य अस्त्राचा प्रयोग करून आकाशात दाटून आलेले काळेभोर ढग एका क्षणात स्वच्छ करून टाकले. ज्या प्रकारे वनराज सिंह मेंढाच्या कळपात शिरून त्यांना उद्वस्त करतो त्याप्रमाणे त्या ढगांना हटविले.

त्या नंतर अर्जुनाने पर्वतास्त्राचा प्रयोग करून रंगभूमीचे रूपांतर एका पर्वतराजित करून टाकले. त्यांना हटवुन अर्जुन स्वतः अंतर्धनास्त्राचा प्रयोग करून अंतर्धान झाला. तो मैदानात कोठेही दिसेना झाला. सर्व प्रजा आश्चर्याने हे सर्व दृश्य पाहत होते. तो कधी रथांवर, कधी अश्वांवर, कधी गजावर, तर कधी भूमीवर डोळ्यांचे पाते लावते ना लावते तो एका ठिकाण्याहुन दुसऱ्या ठिकाणी जाई धनुर्विद्या, मल्लविद्या, ढाल - खडग चालवणे, भाला इत्यादी सर्व अस्त्र शस्त्रामध्ये अर्जुनाने प्राविण्य मिळविले होते. सर्व कौशल्य पणाला लावुन आपली ग्रहण केलेली विद्या अर्जुनाने प्रदर्शित केली. तेव्हा सर्वत्र एकाच आवाज घुमत होता. अर्जुन ! अर्जुन!! अर्जुन !!!.



अर्जुनाला आव्हान 

 

गुरु द्रोणाचार्य आपल्या सिंहासनावरून उठून म्हणाले " हस्तिनापूर नगर वासियाने पहा माझ्या प्रिय शिष्याने मी शिकविलेले सर्व अस्त्र -शस्त्र यांचा खुबीने वापर करून दाखवले आहे. याची चपळता, बाहुबल, हस्तकौशल्य, धनुर्विद्या कुरु कुळातच नाहीतर संपूर्ण आर्यवर्तात याच्या सारखा दुसरा कोणताच धनुर्धर नाहीये. अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे." एवढे बोलताच जवळ असलेली निळ कमळाची माला घेऊन द्रोणाचार्य अर्जुनाकडे जाऊ लागतात. ती माला अर्जुनाच्या गळ्यात घालताच ' थांबा ' असा आवाज झाला. रंगभूमीच्या प्रवेश द्वाराकडून एक ढगात वीज कडाडावी त्या समान एक युवक हातात धनुष्य, पाठीवर भाता, बलदंड पण कसदार रेखीव शरीर, सिंहासमान डौलदार चाल, खणखणीत विजेसमान आवाज, कानात मांसल सोनेरी कुंडले, पिवळा धमक वर्णाचा तो युवक द्रोणाचार्या समोर येऊन उभा राहिला.

 

त्या रंगभूमीवरील सर्वांची नजरा त्या द्वारातील सुंदर युवकांवर खिळून राहिली. दुर्योधन - दुःशासन आदी सर्व बंधू आपआपली शस्त्रे घेऊन उठून उभा राहिली. इकडे अर्जुनाच्या सभोवताली इतर चार म्हणजे युधिष्ठीर, भीम, नकुल, सहदेव हे चौघेही आपआपली शस्त्रे घेऊन अर्जुनाच्या रक्षणासाठी जवळ येऊन उभा राहिली. तो युवक म्हणाला हे " पार्थ, धनुर्विद्येतील जे जे चमत्कार तू केलेस त्यापेक्षा अधिक सरसपणे मी करून तुला दाखवेन, जास्त हस्तकौशल्याचा अभिमान करू नकोस," तेव्हा दुर्योधनाला अधिक प्रसन्नता वाटली त्याने भीष्म पितामह, सम्राट यांना म्हणाला " हे हस्तिनापूर सम्राट आपल्या राज्यातील एक युध्द कुशल युवक आपली कला प्रदर्शित करू इच्छित आहे. तर सद्वर्तनी पितामह, न्याय प्रिय काकाश्री विदुर, सम्राट आपण या युवकासाठी एक संधी आणि आपला निर्णय त्याच्यासाठी न्याय ठरणार आहे त्याला हक्क मिळालाच हवं ." सम्राट धृतराष्ट्र, पितामह भीष्म, महामंत्री विदुर, या सर्वांनी आपापल्या बरोबर काही तरी कुजबुज केली. त्यांनी निर्णय दिला की या युवकांनीही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून दाखवावे. तेव्हा अर्जुनाने जे जे धनुर्विद्येच्या साहाय्याने करून दाखवले ते सर्व त्या युवकाने करून दाखवले विशेषतः अर्जुनापेक्षा अधिक सरसपणे करून दाखवले. सर्व रंगभूमीवर या युवकाचा विजय असो !, जय हो ! असा जयजयकार होऊ लागला. 




 

हे पाहून दुर्योधन आनंदाने त्या युवकांकडे जाऊन म्हणाला " हे युवक, मित्रा, तुझे स्वागत आहे, तू आलास हे आमचे भाग्य " तो युवक म्हणाला " हे कुमार, मला या पार्थासोबत द्वन्द्व करायचे आहे, आणि मीच या आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे हे सिध्द करायचे आहे. " दुर्योधन म्हणाला " हो अवश्य, मित्रा." तेव्हा तो युवक म्हणाला "आचार्य, आपण जर पार्थला आर्यावर्तातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत असाल तर माझ्याबरोबर द्वन्द्व करून तो निर्विवादपणे सिध्द करेल." तेव्हा कुलगुरू कृपाचार्य पुढे येतात आणि म्हणतात, " हे युवक, अर्जुन हा सोमवंशी, कुरुकुलातील, राजमाता कुंतीदेवीचे अनुज पुत्र, सम्राट, दिग्विजयी पांडूपुत्र क्षत्रिय आहे, त्या प्रमाणे तू पण आपला परिचय दे त्याने तुझे माता - पिता कोण आहे ? कोणत्या महान कुळातील आहेस ? त्याचा परिचय दे, एक राजा दुसऱ्या एका राजाबरोबर द्वन्द्व करू शकतो, एक राजकुमार एका राजकुमाराबरोबर किंवा एका राजाबरोबर द्वन्द्व करू शकतो, एक सेनापती एका सेनापती बरोबर किंवा एका राजकुमाराबरोबर द्वन्द्व करू शकतो, तू आपले परिचय द्यावे."




 

या कुलगुरू कृपाचार्य यांच्या वाक्याने तो युवक नि:शब्द झाला.

                                                                                                                                                             to be continued....

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...